चक्रीवादळामुळे रायगडात काही लाख घरांचे नुकसान; रत्नागिरीत तीन हजार झाडे जमीनदोस्त

रत्नागिरी/मुंबई : तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. एक लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. तेथे तीन हजार झाडे आणि विजेचे एक हजार ९६२ खांब मोडून पडले आहेत. रत्नागिरीत महावितरणची १४ उपकेंद्रे कालच्या वादळात नादुरुस्त झाली असून, ती दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.

मुख्यमंत्र्यांचा सहाध्यायी रत्नागिरीत नव्या संधीच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सहाध्यायी सदानंद भोगले हा सध्या रत्नागिरीत राहणारा कलाकार करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे बंद पडलेले कलेतून रोजगाराचे साधन पुनरुज्जीवित होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

‘ये’ आप भी ‘करो ना’ : मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीत मदतीचे आवाहन

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी केंद्र, तसेच राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतच आहे. नागरिकांनीही त्यात ऐच्छिक आर्थिक मदतीद्वारे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान, तसेच मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँक खात्यांचे तपशील जाहीर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात अखेर संचारबंदी लागू

करोना संसर्गाशी दोन हात करण्यासाठी राज्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता; मात्र तरीही लोक रस्त्यांवर येत असल्याने राज्यात संपूर्ण

आता वीजही मिळणार मोफत

कोकण मीडियाच्या सहा मार्च २०२०च्या अंकाचे संपादकीय… राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या तीन पक्षांचे सरकार अधिकारावर आल्यापासून नागरिकांना वेगवेगळ्या आणि मोफत सेवा देण्याच्या घोषणा सातत्याने होत आहेत. अवघ्या दहा रुपयांमध्ये म्हणजेच जवळजवळ फुकट शिवभोजन देण्याच्या क्रांतिकारी योजनेनंतर आता शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात केलेली घोषणा हे त्याचेच आणखी एक पुढचे पाऊल आहे.