रसौषधींच्या ज्ञानाचा अर्क : वैद्य‌ रघुवीर भिडे

वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांचे आज (२७ जुलै) निधन झाले. सावंतवाडीतील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा श्रद्धांजलीपर लेख….

रत्नागिरीत नवे ५६ करोना रुग्ण; एकूण संख्या १५५५

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ जुलै) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे २१ नवे रुग्ण सापडले. तसेच, आज रात्री साडेनऊ वाजल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, आणखी ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण ५६ रुग्णांची भर पडली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५५५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३१९ झाली आहे.

तुम्ही सर्जनशील आहात? मग ही अपुरी कथा पूर्ण करा आणि बक्षिसे मिळवा…

दोडामार्ग : येथील दोडामार्ग एक्स्प्रेस काव्यमंचाने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय खुली कथापूर्ती स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात

नोकरीच्या महाद्वाराकडे बेरोजगार कोकणाची पाठ

बेरोजगार मनुष्यबळ आणि मनुष्यबळाची आवश्यकता असलेले उद्योग यांचा समन्वय महाजॉब्ज संकेतस्थळाने साधला आहे. पहिल्याच दिवशी संकेतस्थळावर सुमारे ९० हजार तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली, तर कामगारांची गरज असलेल्या साडेसातशे कंपन्याही नोंदविल्या गेल्या. या संधीचा उपयोग कोण कसा करून घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोकणातील कोणीही संकेतस्थळाचा उपयोग करून घेतला गेला नसल्याचे दिसते.

अभ्यंकर विद्यामंदिराने जपली दीप अमावास्येला दिव्यांच्या प्रदर्शनाची प्रथा

आषाढ अमावास्या तथा दीप अमावास्येचे औचित्य साधून रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात प्राचीन काळापासूनच्या दिव्यांचे प्रदर्शन दर वर्षी मांडण्यात येते. २० जुलै रोजी दीप अमावास्या आहे; पण करोना प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील प्रदर्शनाचा आढावा घेणारा एक व्हिडिओ शाळेने सर्व विद्यार्थ्यांना पाठवला आहे आणि या प्रदर्शनाच्या प्रथेत खंड पडू दिलेला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासांत ६० नवे करोनाबाधित; तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : आज (१७ जुलै) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत रत्नागिरी जिल्ह्यात ६० नवे करोनाबाधित सापडले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या एक हजार १३०, तर बरे झालेल्यांची संख्या ६८२ झाली आहे. कालपासून आज सायंकाळपर्यंत तिघा करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे.