गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची टिळक अभिवादन यात्रा उत्साहात

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन यात्रेतून मानवंदना देण्यात आली.

मराठ्यांचे पाऊल पडलेला प्रत्येक भाग आज भारतात – प्रा. पंकज घाटे

रत्नागिरी : इतिहासकाळात जेथे जेथे मराठ्यांचे पाऊल पडले, तो प्रत्येक भाग आज भारतात आहे, याचे श्रेय शिवरायांना आहे, असे विचार येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहास विभागातील प्रा. पंकज घाटे यांनी व्यक्त केले.

भारतीय शास्त्रज्ञांचे कार्य आइनस्टाइनच्या संशोधनाच्या तोडीचे : अ. पां. देशपांडे

रत्नागिरी : डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर आणि डॉ. भालचंद्र उदगावकर या आंतरराष्ट्रीय भौतिक शास्त्रज्ञांचे संशोधनकार्य आइनस्टाइन यांच्या संशोधनाच्या दर्जाइतके श्रेष्ठ होते, असे मत मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत देशपांडे यांनी व्यक्त केले.

२ महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या सागरी नौका मोहिमेचे काळबादेवीत स्वागत

रत्नागिरी : येथील २ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी. युनिटची दहा दिवसांची कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका मोहीम काळबादेवी येथे समाप्त झाली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेचे शानदार स्वागत केले.

छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास जगासमोर मांडणे हे बाबासाहेब पुरंदरेंचे ईश्वरी कार्य : अॅड. विलास पाटणे

‘सतत वाचन, आनंदी-सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर मांडण्याचे ईश्वरी कार्य केले. आयुष्यभर प्रवास करून दिलेल्या व्याख्यानांतून मिळालेला पैसा बाबासाहेबांनी शिवप्रतिष्ठानकडे सुपूर्द केला. पुण्यातील आंबेगाव येथे २१ एकर जमिनीवर भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी, हे बाबासाहेबांनी आयुष्यभर उराशी बाळगलेले एक स्वप्न आहे. शिवचरित्र समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य तुमचे-आमचे सर्वांचे आहे. या कार्यातूनच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहू या,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.

कॅप्टन सीमा कदम ‘एनसीसी’ ‘जीवन गौरव’च्या देशातील पहिल्या महिला मानकरी

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) कॅप्टन डॉ. सीमा कदम यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘महासंचालक गौरव सन्मान’ येथील वार्षिक प्रशिक्षण शिबिरात प्रदान करण्यात आला. प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराच्या त्या भारतातील प्रथम मानकरी ठरल्या आहेत.