सावरकर परिवार विशेषांकाचे शानदार प्रकाशन

ठाणे : सावरकरांचे राष्ट्रप्रेम आणि सावरकरांची देशभक्ती याबरोबरच त्यांचे आजच्या काळाला अनुसरून असणाऱ्या विज्ञानवादी विचारांचा अधिक प्रचार प्रसार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अनुवादक डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

Continue reading

डॉ. जगन्नाथ दीक्षित जीवनशैलीची ठाण्यात विनामूल्य सल्ला केंद्रे

ठाणे: ‘दीक्षित डाएट’ हा जीवनशैली बदलण्याचा मार्ग आहे, आपल्याला निरोगी, मधुमेहमुक्त आयुष्य जगायचे असेल आणि वजन कमी करायचे असेल, तर जीवनशैली बदलणे गरजेचे आहे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ आणि ‘दीक्षित डाएट’चे प्रणेते आडोर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी ठाणेकरांना आज (३१ जानेवारी) दिला.

Continue reading

ठाण्याची श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडियाची विजेती

ठाणे : येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ संदीप माने यांची कन्या श्रुतिका माने (वय २०) ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली. उद्याची डॉक्टर आज सौंदर्य स्पर्धेतील विजेती ठरली आहे.

Continue reading

‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!!

करोनाचा पहिला फटका पर्यटनाला बसला. या धक्क्यातून सर्वांत शेवटी सावरणारा व्यवसायही पर्यटनच असेल. पृथ्वीवरील सर्वच ठिकाणे सुंदर होती. आपण त्या सौंदर्यांचे अभयारण्य, पार्क, कृषी पर्यटन आदी तुकडे पाडले. हे तुकडे नीट सांभाळण्याची जाणीव करोनाने करून दिली आहे. चला तर मग, आपण ‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!! रोजगार निर्मिती साधू या!!! आज (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिन. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…

Continue reading

दृष्टी नसली म्हणून काय झालं… तिची जिद्द उत्तुंग आहे!

सुजाता कोंडीकिरे ही तरुणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (पूर्व) शाखेत अधिकारी आहे. तिच्याकडे सध्या स्टेट बँकेच्या व्यवसायवृद्धीची जबाबदारी आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात तिने एसबीआय लाइफचा ५० लाख रुपयांचा, तर २०१९-२० या वर्षात एक कोटी रुपयांचा व्यवसाय करून तिला दिलेले उद्दिष्ट साध्य केलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर तिने अंबरनाथ येथे बँकेचे गृहकर्ज काढून फ्लॅटपण खरेदी केला आहे. हे सर्व वाचून आपल्याला असं वाटेल, की यात काय मोठंसं? किती तरी मुलं-मुली असं सर्व करून दाखवतात. तिने केलं तर काय विशेष? पण सुजाताने जे काही करून दाखवलं आहे, ते विशेषच आहे. कारण तिने तिच्या पूर्ण अंधत्ववर, अंधत्वाने आलेल्या नैराश्यावर मात करत हे यश मिळवलं आहे. तिची कहाणी खूप प्रेरक आहे.

Continue reading

चक्रीवादळ अलिबागला धडकणार; रत्नागिरीतील चार हजार जणांचे स्थलांतर

रत्नागिरी/मुंबई : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे अखेर चक्रीवादळात रूपांतर झाले असून, ते तीन जून रोजी दुपारी ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने अलिबागच्या जवळ किनाऱ्यावर धडकणार आहे. याबद्दलचा ‘ऑरेंज मेसेज’ (चक्रीवादळाची पूर्वसूचना/दक्षतेचा इशारा) हवामान विभागाने जाहीर केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या उत्तर कोकणातील जिल्ह्यांसह दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांना या वादळाचा थेट फटका बसणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहणार आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या मंडणगड, दापोली, गुहागर या तीन तालुक्यांमधील चार हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून तीन जूनला सकाळी नऊ ते दुपारी १२ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Continue reading