विघ्नहर्ता आला, रस्त्यांचे विघ्न कायम!

ते रस्ते दुरुस्त होण्याची शक्यता नाही. लोक कंटाळतात आणि तक्रार करायचे थांबतात. नंतर त्यांनाही त्याची सवय होते आणि लोकांच्या अल्पस्मृतीचीच ही सवय शासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांना माहीत असते. अनेक वर्षे हे असेच सुरू आहे. यापुढेही तसेच चालणार आहे. विघ्नहर्ता आला. त्याच्यासोबत सण साजरा करून गणपती गावाला जाईल, चाकरमानी मुंबईला परततील. रस्त्यांमधील खड्ड्यांचे विघ्न कायम राहणार आहे.

परशुराम घाटातील मेगाब्लॉकच्या वेळेत बदल

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत बंद राहणार आहे. त्या मेगाब्लॉकच्या वेळेत बदल झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या २ मे रोजीच्या पत्रकात म्हटले आहे.

परशुराम घाटातील मेगाब्लॉकच्या काळात वापरासाठी पर्यायी रस्ते निश्चित

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी येत्या २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबद्दलचा आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज (२३ एप्रिल) जाहीर केला. या काळात वाहतुकीसाठी पर्यायी रस्तेही निश्चित करण्यात आले आहेत.

परशुराम घाटातील मेगाब्लॉक २५ एप्रिल ते २५ मेपर्यंत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी येत्या २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. यापूर्वी २० एप्रिलपासून पाच तास घाट बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला होता. आजच्या बैठकीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ असे तास घाट बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

परशुराम घाटात २० एप्रिलपासून दररोज दुपारी ५ तास मेगाब्लॉक

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील वाहतूक येत्या २० एप्रिलपासून घाटाची दुरुस्ती होईपर्यंत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

आंबडवे येथे पुढच्या वर्षापासून महामानवाची जयंती शासकीय स्तरावर

मंडणगड : आंबडवे (मंडणगड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने साजरी केली जाणारी जयंती पुढच्या वर्षापासून राज्य शासनाच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.