रत्नागिरीच्या ब्रह्मरत्न संस्थेतर्फे केळशीत वादळग्रस्तांसाठी श्रमदान

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीमधील दापोली, मंडणगड तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील केळशी गावात रत्नागिरीच्या ब्रह्मरत्न संस्थेमार्फत श्रमदान करण्यात आले.

‘निसर्ग’मुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान; ‘जीआय’ १० वर्षे लांबणार

रत्नागिरी : गेल्या तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुपारीची लागवडच उद्ध्वस्त झाल्याने विद्यापीठाने विकसित केलेल्या सुपारीच्या श्रीवर्धनी प्रजातीला भौगोलिक निर्देशन (जीआय) मिळवून देण्याची प्रक्रिया तर तब्बल दहा वर्षे लांबणार आहे. त्यामुळे विद्यापीठाबरोबरच बागायतदारांचेही नुकसान होणार आहे.

वादळानंतर अद्यापही सरकारकडून कोकणाला पुरेशी मदत नाही : फडणवीस यांची टीका

रत्नागिरी : ‘कोकणातील चक्रीवादळानंतरची परिस्थिती पाहून शासनाने मदत केल्याचे दिसत नाही. शासनाचे अस्तित्वच दिसत नाही,’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी आज (१२ जून) रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यांचा दौरा केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्गुरू वामनराव पै यांनी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या त्यांच्या प्रसिद्ध उक्तीतून दिला आहे. करोनाचे जगद्व्यापी संकट आणि कोकणात निसर्ग चक्रीवादळाने दिलेला दणका या पार्श्वभूमीवर या उक्तीचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

कोकणातील नुकसानाविषयी शरद पवार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई : दोन दिवस कोकणाचा दौरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (११ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कोकणातील निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची माहिती पवार यांनी त्यांना दिली. फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड त्यांना सांगण्यात आली.

महामानवाच्या स्मारकाने दिला अनेकांना आधार

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला. त्यात मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. घराची छपरे उडून जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाने गावातील अनेक कुटुंबांना आधार दिला.