रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात तौते चक्रीवादळामुळे निर्माण झालेला वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी राज्याच्या इतर भागातूनही साहित्य आणले जात आहे. आज जालना येथून खां आणि ट्रान्स्फार्मर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दरम्यान, महावितरणने सुरू केलेल्या युद्धपातळीवरील कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.