‘योजक’चा ‘योजक’ हरपला; नाना भिडे यांचे निधन

कोकणातील दुर्लक्षित फळांवर संशोधन करून त्यापासून दर्जेदार प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या ‘योजक असोसिएट्स’चे संस्थापक कृष्णा पर्शराम तथा नाना भिडे यांचे आज (१६ मे) सकाळी रत्नागिरीतील टिळक आळी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कोकणातील फळप्रक्रिया उत्पादनांचे नाव त्यांनी देशातच नव्हे, तर जगाच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवले. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख…

रत्नागिरीतील करोना रुग्णसंख्या ८२; आज सापडले नवे पाच रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरीतील करोना रुग्णांची संख्या वाढतच असून, आज (१५ मे) पाच नव्या रुग्णांची भर त्यात पडली आहे. कालही (१४ मे) तीन रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ८२ वर पोहोचली आहे. त्यापैकी पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत जिल्ह्यात तीन जणांचा बळी करोनाने घेतला आहे.

प्रशासनाच्या हतबलतेचा विपर्यस्त अर्थ

जिल्ह्याच्या सुरक्षेच्या बाबतीत नव्हे, तर परवान्यांविना मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांना थोपविण्याच्या बाबतीत असलेली हतबलता त्यांनी व्यक्त केली. मात्र अपेक्षेप्रमाणेच विपर्यस्त स्वरूपात त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि जिल्ह्याचे प्रशासन करोनाच्या बाबतीत हतबल झाले, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यातून वेगळा संदेश सर्वत्र गेला. करोनाचे संकट सुरू झाल्यापासून प्रशासनाने केलेली उत्तम कामगिरी या एका हतबलतेच्या बातम्यांमुळे पूर्णपणे झाकोळली गेली.

रत्नागिरीतील रुग्णसंख्या ७४वर; आज नवे २२ ‘पॉझिटिव्ह’

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २२ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे.

‘… तेच धनंजय कीरांचं खरं स्मारक होईल…!’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वा. सावरकर आदी नेत्यांची चरित्रे लिहिणारे सव्यसाची चरित्रकार आणि रत्नागिरीचे सुपुत्र धनंजय कीर यांचा १२

कोकणातील हजारो सी-मेन्सना परत आणण्यासाठी भाजप नेते बाळ माने प्रयत्नशील

रत्नागिरी : विविध मालवाहू जहाजांवर काम करणारे कोकणातील अधिकारी, सी-मेन्सना (खलाशी) परत आणण्याकरिता भाजपचे कोकणातील नेते बाळ माने यांनी पुढाकार घेऊन डीजी शिपिंग व केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. कोकणात किमान पाच हजार सी-मेन्स असून, त्यातील बरेच जण नोकरीवर आहेत. हे सारे जण घरी परतावेत, अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. म्हणून माने यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.