`ब्रेक दि चेन’ अंतर्गत संचारबंदीमध्ये काय सुरू असेल? काय बंद असेल?

मुंबई : राज्यात आज, (१४ एप्रिल) रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत काय सुरू राहील आणि काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती राज्य शासनाच्या नियमावलीत देण्यात आली आहे.

हृदयी बाबा तुमची ज्योत… (डॉ. आंबेडकरांना गीतातून अभिवादन)

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रत्नागिरीतील श्रीकांत ढालकर यांनी लिहिलेलं आणि सादर केलेलं हे गीत…

राज्यात १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत कडक संचारबंदी

मुंबई : करोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. १३) रात्री केली. उद्या, बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून १ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

मुंबईत बाळशास्त्री जांभेकरांचे स्मारक उभारण्याची मागणी

मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक `दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईतील काळबादेवी भागात भव्य राष्ट्रीय स्मारक राज्य शासन व मुंबई महापालिकेने उभारावे. तसेच मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र होणाऱ्या विद्यापीठाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ असे नाव द्यावे, अशी मागणी करणारा विशेष ठराव महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाने केला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना तीन वर्षांत ३०० कोटीचा निधी

मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता येत्या तीन वर्षांत दरवर्षी शंभर कोटींप्रमाणे ३०० कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत केली.

बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकासाठी निधी जाहीर झाल्याने समाधान

सिंधुदुर्गनगरी : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे राज्यातील पहिले स्मारक बाळशास्त्री यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याचे आज जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दल पोंभुर्ले येथे सर्वप्रथम स्मारक उभारणाऱ्या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेने समाधान व्यक्त केले आहे.