‘टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी हवी; पण शेतकरीहितासाठी सध्याचे नियम जाचक’

वाइन उत्पादनाचे नियम आणि निकष केवळ बड्या उद्योजकांना अनुकूल ठरतील असेच आहेत. केवळ द्राक्षांपासूनच नव्हे, तर अनेक फळांपासून वाइन करता येते. वाइननिर्मितीची ही प्रक्रिया कोणताही छोटा शेतकरी किंवा उत्पादक घरच्या घरी करू शकतो; मात्र सरकारचे सध्याचे नियम त्याला तशी परवानगी देत नाहीत, असा दावा या विषयात अनेक यशस्वी प्रयोग केलेले दापोलीतील उद्योजक माधव महाजन यांनी केला आहे. वाइन म्हणजे दारू नव्हे, तर ते पोषणमूल्य असलेले पेय असल्याने अगदी चहा टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी मिळायला हवी, असेही त्यांचे म्हणणे आहे.

वेत्ये समुद्रकिनाऱ्यावर यावर्षी सर्वप्रथम उमटणार कासवांची पाउले

राजापूर : ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे आज वेत्ये (ता. राजापूर) येथे कासवाची ६१ अंडी आढळून आली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात या किनाऱ्यावर जिल्ह्यात सर्वप्रथम कासवांची पावले उमटणार आहेत.

डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना धन्वंतरी, तर अनघा प्रभुदेसाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

राजापूर : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० च्या दोन पुरस्कारांचे वितरण २४ ऑक्टोबर २०२१ रोजी राजापूर हायस्कूलच्या कलामंदिरात समारंभपूर्वक करण्यात आले. या वेळी धन्वंतरी पुरस्कार डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना आणि आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. अनघा विश्वास प्रभुदेसाई यांना डॉ. अरुण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राजापूरमध्ये २४ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या २०२०मधील दोन पुरस्कारांचे राजापूरमध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) वितरण करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता राजापूर हायस्कूलच्या कलामंदिरात हा कार्यक्रम होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण जोशी उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याला पाच दिवसांसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून १३ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

चार दिवसांत अतिजोरदार पावसाची शक्यता, सावधगिरीचा इशारा

त्नागिरी : येत्या ११ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला.