रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचा कालावधी येत्या १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.
जिल्ह्यात करोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी मिशन ब्रेक द चेन या नावाने गेल्या १ जुलैपासून आठ दिवसांसाठी लॉकडाउन सुरू करण्यात आले होते. आज (ता. ८ जुलै) त्याची मुदत संपल्याने पुढे काय होणार, याबाबत उत्सुकता होती. ती आता संपली आहे. लॉकडाउन येत्या १५ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. या कालावधीत पूर्वी लागू असलेले निर्बंधच 15 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.
(जिल्हाधिकाऱ्यांच्या मूळ आदेशाची प्रत वाचण्यासाठी खाली क्लिक करा.)
….