Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

२५ एप्रिल ते १० मे २०२३ या कालावधीत परशुराम घाट बंद

Advertisements

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरचा चिपळूणजवळचा परशुराम घाट २५ एप्रिल ते १० मे २०२३ या कालावधीत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूणमार्गे वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. (पर्यायी मार्गाचा नकाशा बातमीच्या शेवटी दिला आहे.)

पनवेल-महाड-पणजी रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या परशुराम घाटामधल्या १.२० किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण उंच डोंगररांगा व खोल दऱ्यांमुळे अवघड स्वरूपाचे आहे. यातील चौथ्या टप्प्याचे काम अवघड स्वरूपाचे असल्याने त्या ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेल्या मातीमुळे खाली महामार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी व पुढील संभाव्य जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी, पोलीस विभाग व परिवहन विभाग यांचे संयुक्तपणे निरीक्षण असेल.

बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूण मार्गे वळविण्याबाबतची कार्यवाही करताना काही अटीही घालण्यात आल्या आहेत. त्या अशा –

परशुराम घाटातील वाहतूक थांबविल्यास त्या ठिकाणी थांबलेल्या वाहनधारकांकडून रोष व्यक्त होण्याची शक्यता राहते. त्यामुळे घाटात सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने दोन्ही विभागांनी किमान उप अभियंता दर्जाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.

(सोबतच्या चित्रात पर्यायी मार्ग दर्शवला आहे.)

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version