उद्योजक
होय. हे खरे आहे. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात असलेला वाळवीचा प्रादुर्भाव कमी करण्यात आम्हाला म्हणजे ओम पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कंपनीला ३ महिन्यांत यश आले.
ओम पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कंपनी मी सुरू केली. या व्यवसायात आम्हाला यशस्वीरीत्या कामाचा एक दशकाचा अनुभव आहे. ही आयएसओ प्रमाणित कंपनी आहे. पण रत्नागिरीला आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो, तेव्हा आणि आताच्या परिस्थितीत खूप बदल झाला आहे. कारण आमची शाखा सुरू होण्याच्या अगोदर ग्राहकांना पेस्ट कंट्रोल केल्यानंतर आपले घर किंवा आपल्या व्यवसायाचे ठिकाण बंद ठेवावे लागत होते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून दिलेल्या आमच्या पेस्ट कंट्रोलच्या सर्व्हिसमुळे ग्राहकांच्या समस्या दूर झाल्या. घर बंद ठेवणे, कीटकनाशकांचा वास येणे, शरीरावर होणारा त्रास या समस्या सोडवण्यात आम्ही त्यांना मदत केली. पर्यावरणपूरक आणि विनाहानिकारक कीटकनाशक आम्ही वापरतो.
आतापर्यंत विविध ठिकाणची बांधकामे, बँका, कॉर्पोरेट कंपन्या, हॉटेल, सोसायटी, शाळा, महाविद्यालय, मार्मा कंपनीसह वैयक्तिक ग्राहकांनीही आमची सेवा घेतली असून त्यामुळे ते समाधानी आहेत. अशाच संस्था आणि व्यक्तिगत गरजा असलेल्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांचे समाधान होईल, याची खात्री आम्ही देतो. कारण आम्ही ग्राहकांना नियिमतपणे आणि त्वरित प्रतिसाद देतो. आधुनिक आरोग्यपूर्ण आणि परिणामकारक उत्पादनांच्या साहाय्याने ग्राहकांच्या सेवेत सदैव उपलब्ध असतो.
आम्ही वासहीन उत्पादने वापरतो. एमएमसीच्या काळात अतिरिक्त सर्व्हिसेसची गरज असल्यास ती देतोच. त्याचे अतिरिक्त शुल्क आम्ही आकारत नाही. आम्ही पेस्ट कंट्रोल सेवा पुरविल्यानंतर तुम्हाला तुमचे घर बंद ठेवायची गरज नाही. आमची सेवा पर्यावरण आणि प्राण्यांच्या दृष्टीने सुरक्षित आहे. आम्ही सेवेनंतर सर्व प्रकारची कागदपत्रे देतो.
आम्ही आमच्या ग्राहकाच्या वेळेत सेवा देतो. आमचे टेक्निशियन त्यांच्या कामात कुशल आहेत. शिवाय आम्ही त्यांना वारंवार प्रशिक्षणही देतो.
- प्रकाश कृष्णाजी मांजरेकर
ओम पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस
101 डी, सिद्धिविनायक सिटी सेंटर,
रिलायन्स मार्टच्या वर, शिवाजीनगर, रत्नागिरी
संपर्क क्रमांक : 8425892371, 8097010530


