रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३१ ऑक्टोबर) करोनाचे केवळ ९ रुग्ण आढळले, तर १४ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आता केवळ १४८ जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही.
जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे ९ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ९२६ झाली आहे. आज १४ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार २२९ झाली आहे. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.६६ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५७४ नमुन्यांपैकी ५७० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ६०० नमुन्यांपैकी ५९५ अहवाल निगेटिव्ह, तर ५ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ८ हजार ८२६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज १४८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ७६, तर लक्षणे असलेले ७२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ६५ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात ८३ जण आहेत. आणखी १३ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ११, डीसीएचसीमधील ३०, तर डीसीएचमध्ये ४२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी २९ जण ऑक्सिजनवर, १४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ५.२६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४७२ आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२०, खेड २२६, गुहागर १७२, चिपळूण ४७६, संगमेश्वर २१९, रत्नागिरी ८२५, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४७२).
३० ऑक्टोबरपर्यंतच्या स्थितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील ९ लाख १९ हजार ९०४ जणांनी करोनाप्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला असून, ३ लाख ८८ हजार ४३५ जणांनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या १३ लाख ८ हजार ३३९ आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media