person holding covid sign

रत्नागिरीत नव्या करोनामृताची नोंद नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ ऑक्टोबर) करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ५७ रुग्ण आढळले, तर ५८ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार २५७ झाली असून, ७५ हजार २१६ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.११ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ५७ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २९६ पैकी २६६ अहवाल निगेटिव्ह, तर ३० पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ११२४ नमुन्यांपैकी १०९७ अहवाल निगेटिव्ह, तर २७ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ६७ हजार ३७३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ६०८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३५६, तर लक्षणे असलेले २५२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३१४ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २९४ जण आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४२, डीसीएचसीमधील ११३, तर डीसीएचमध्ये १३९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ५७ जण ऑक्सिजनवर, २६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.३७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४३३ एवढीच आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२२, गुहागर १६८, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१३, रत्नागिरी ८११, लांजा १२६, राजापूर १६१. (एकूण २४३३).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply