रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे २२ नवे रुग्ण आढळले, तर नाही. आज (दि. २ जुलै) ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ८४ हजार ८६२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८२ हजार २१६ म्हणजे ९६.८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २३० पैकी २१९ निगेटिव्ह, ११ पॉझिटिव्ह, तर रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या २१९ जणांच्या नमुन्यांपैकी १६१ निगेटिव्ह आणि ११ पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ५३ हजार ७७५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ११२ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ८७ रुग्ण गृहविलगीकरणात, तर लक्षणे असलेले १९ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. सहा रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे.
अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि ८, तर डीसीएचमध्ये ११ रुग्ण उपचार घेत आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण दाखल नाही. बाधितांपैकी दोन रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण नाही.
जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. जिल्ह्याचा एकूण मृत्युदर २.९९ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड