रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २० मार्च) करोनाची स्थिती सामान्य राहिली. आज एकही नवा रुग्ण आढळला नाही की एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात केवळ ४ सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४६६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९२७ म्हणजे ९६.९९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेले सर्व १०६ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले सर्व १४२ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ३३ हजार ४१७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ४ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ३, तर लक्षणे असलेला १ रुग्ण आहे. गृह विलगीकरणात ३, तर संस्थात्मक विलगीकरणात १ जण आहे. एका रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे.
अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. डीसीएचमध्ये एकमेव रुग्ण उपचारांखाली आहे. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तसेच अतिदक्षता विभागातही एकही रुग्ण नाही.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २,५३४).
जिल्ह्यातील लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात १९ मार्च रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ३१ सत्रे पार पडली. त्यात ४५ नागरिकांनी लशीचा पहिला, तर ३४० जणांनी दुसरा डोस घेतला. शिवाय ४७ जणांनी बूस्टर डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण ४३२ जणांचे लसीकरण १९ मार्च रोजी झाले. १९ मार्चपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५३ हजार ७६० जणांचा पहिला, तर ८ लाख ७८ हजार ३०३ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख ३६ हजार ५२३ जणांचे लसीकरण झाले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
